Skip to product information
Overview:
कविता म्हणजे तुमच्या मनातील भावभावना, एखाद्या प्रसंगामुळे उठलेले विचारांचे आणि भावनांचे तरंग शब्दात मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिया खैरेपाटील यांच्या मनतरंग या कवितासंग्रहातील साऱ्या कविता वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय देतात. या कवितांची लांबी विषम आहे, काही कविता एक पानी तर काही थोड्या मोठ्या आहेत. या कवितासंग्रहामध्ये या कवितांना समर्पक अशी अतिशय रेखीव चित्रे सामाविष्ट करण्यात आली आहेत. या कवितांमध्ये कवयित्री विविध विषय हाताळताना दिसतात. विठ्ठलाबद्दलच्या कवितेने संग्रहाची सुरुवात होते तर शेवटची कविता चहा आणि कवयित्रीचं नातं उलगडून सांगते. अतिशय सोप्या भाषेत लिहिलेल्या या कविता दैनंदिन आयुष्यातील घडामोडींवर सूचक भाष्य करतात. वरवर अतिशय साधारण वाटणाऱ्या या कवितांमधून काही वेळा कवयित्रीने मानवी नात्यांबद्दल, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीबद्दल, स्त्रियांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनाबद्दल अतिशय नेमकेपणाने भाष्य केलं केलं आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
कविता म्हणजे तुमच्या मनातील भावभावना, एखाद्या प्रसंगामुळे उठलेले विचारांचे आणि भावनांचे तरंग शब्दात मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. प्रिया खैरेपाटील यांच्या मनतरंग या कवितासंग्रहातील साऱ्या कविता वाचकाला याचा नक्कीच प्रत्यय देतात. या कवितांची लांबी विषम आहे, काही कविता एक पानी तर काही थोड्या मोठ्या आहेत. या कवितासंग्रहामध्ये या कवितांना समर्पक अशी अतिशय रेखीव चित्रे सामाविष्ट करण्यात आली आहेत. या कवितांमध्ये कवयित्री विविध विषय हाताळताना दिसतात. विठ्ठलाबद्दलच्या कवितेने संग्रहाची सुरुवात होते तर शेवटची कविता चहा आणि कवयित्रीचं नातं उलगडून सांगते. अतिशय सोप्या भाषेत लिहिलेल्या या कविता दैनंदिन आयुष्यातील घडामोडींवर सूचक भाष्य करतात. वरवर अतिशय साधारण वाटणाऱ्या या कवितांमधून काही वेळा कवयित्रीने मानवी नात्यांबद्दल, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीबद्दल, स्त्रियांकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टीकोनाबद्दल अतिशय नेमकेपणाने भाष्य केलं केलं आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available