"भारत विरुद्ध चीन" हे पुस्तक खरोखरच उत्तम आहे. यात कांती बाजपेयी यांनी भारत-चीन संबंधांचा इतिहास, राजकीय व लष्करी घडामोडी आणि दोन्ही देशांमधील संबंध कसे बदलत गेले याचं स्पष्ट आणि सोप्या भाषेत विवेचन केलं आहे. एखाद्या गंभीर विषयावर सखोल अभ्यास करून तो सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे.
रामचंद्र गुहा -
दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव वाढलेला असताना हे उपयुक्त पुस्तक अत्यंत योग्य वेळी आलेलं आहे. धोरणकर्ते आणि चीनबाबत अभ्यास करणाऱ्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक आहे.
-शशी थरूर
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत असताना, बाजपेयी यांचं हे पुस्तक दोन्ही देशांतील मतभेद, राजकीय स्वार्थ आणि सामर्थ्य यांचा सखोल मागोवा घेतं. हे तणावपूर्ण संबंध समजून घ्यायचे असतील तर हे पुस्तक नक्की वाचायला हवं.
-अॅशले जे. टेलिस
बाजपेयी यांची विषयाची समज आणि सहज लेखनशैली यामुळे हे पुस्तक वाचायला रंजक आणि माहितीपूर्ण वाटेल.
- करण थापर
चीनविरोधात भारताला कोणत्या अडचणी येतात, हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.
- प्रणय रॉय
कांती बाजपेयी हे भारतातील आंतरराष्ट्रीय घडामोडींचे एक अनुभवी अभ्यासक आहेत. भारत-चीन संघर्षावरील हे पुस्तक त्यांनी अभ्यासपूर्वक आणि सोप्या भाषेत लिहिलं आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours