Skip to product information
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 499.00
Overview:
प्राचीन काळापासून भारताने गुरू-शिष्यांची संपन्न परंपरा जपली आहे. आपल्या देशाच्या इतिहासात असे अनेक महान गुरू-शिष्य होऊन गेले, ज्यांनी आपल्या आदर्श आचरणाद्वारे संपूर्ण जगापुढे गुरू-शिष्य नात्याचे सर्वोत्तम उदाहरण ठेवले. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते. गुरू आपल्याला बहुमूल्य असे ज्ञान देतात, पदोपदी मार्गदर्शन करतात. त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला दिशा मिळते. गुरूंकडून ज्ञानप्राप्ती करून आपले आयुष्य घडवणे आणि या ज्ञानाचा समाजासाठी योग्य तो वापर करणे ही शिष्याची जबाबदारी असते. हे कर्तव्य यथोचित निभावणारी व्यक्तीच शिष्योत्तम ठरते. प्रस्तुत पुस्तकात यांपैकी विविध ४५ गुरू-शिष्यांच्या प्रसिद्ध कथा सांगण्यात आल्या असून संस्कारक्षम वयातील मुलामुलींसाठी त्या नक्कीच प्रेरक ठरतील. ———————————————————————————————————————— भारतीय संस्कृतीला प्राचीन काळापासून पारंपारिक कथा आपण ऐकलेल्या आहेत. या कथांनी मानवी जीवमूल्यांची जपणूक करून मानवांवर संस्कार केले. या कथांमध्ये इसापनीती कथांचा महत्त्वाचा वाटा आहे. इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षं या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात कसे वागावे, याचे ज्ञान आणि शिकवण दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासारविचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतीकथा आबालवृद्धांना प्रेरणा देणार्या आहेत. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
प्राचीन काळापासून भारताने गुरू-शिष्यांची संपन्न परंपरा जपली आहे. आपल्या देशाच्या इतिहासात असे अनेक महान गुरू-शिष्य होऊन गेले, ज्यांनी आपल्या आदर्श आचरणाद्वारे संपूर्ण जगापुढे गुरू-शिष्य नात्याचे सर्वोत्तम उदाहरण ठेवले. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते. गुरू आपल्याला बहुमूल्य असे ज्ञान देतात, पदोपदी मार्गदर्शन करतात. त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला दिशा मिळते. गुरूंकडून ज्ञानप्राप्ती करून आपले आयुष्य घडवणे आणि या ज्ञानाचा समाजासाठी योग्य तो वापर करणे ही शिष्याची जबाबदारी असते. हे कर्तव्य यथोचित निभावणारी व्यक्तीच शिष्योत्तम ठरते. प्रस्तुत पुस्तकात यांपैकी विविध ४५ गुरू-शिष्यांच्या प्रसिद्ध कथा सांगण्यात आल्या असून संस्कारक्षम वयातील मुलामुलींसाठी त्या नक्कीच प्रेरक ठरतील. ———————————————————————————————————————— भारतीय संस्कृतीला प्राचीन काळापासून पारंपारिक कथा आपण ऐकलेल्या आहेत. या कथांनी मानवी जीवमूल्यांची जपणूक करून मानवांवर संस्कार केले. या कथांमध्ये इसापनीती कथांचा महत्त्वाचा वाटा आहे. इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षं या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात कसे वागावे, याचे ज्ञान आणि शिकवण दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासारविचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतीकथा आबालवृद्धांना प्रेरणा देणार्या आहेत. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available