जागरण
कुणाचे तरी गुलाम बनून राहणे ही आपली वृत्ती आहे.
गुलामाला विचार करायची अक्कल तर नसतेच; पण ‘का?’ असा प्रश्न विचारायची सोयही नसते.
विवेकशून्य स्वातंत्र्य आणि आत्महत्या यांत काहीही फरक नाही. विवेकी माणसाला कुणाचे ऐकायचे हे माहीत तर असतेच; पण एकदा ठरवल्यावर परिणामांची जबाबदारी तो आपलीच आहे असे मानतो आणि तसेच वर्तन करतो; याउलट गुलामाचे वर्तन असते.
हे नको असेल तर आपल्याला स्वतःपासून सुरुवात करायला हवी. आपण कुणाकुणाचे आणि कसे गुलाम झालो आहोत, हे आपण समजून घेण्याची सुरुवात करायला हवी म्हणजे स्वतंत्र होण्याची वाट आपल्याला दिसेल.
डॉ. राजीव चिंतामण शारंगपाणी
तंदुरुस्त रहा, खुषीत जगा
शरीराची हालचाल कमीतकमी करण्याच्या मानवी इतिहासातील नीचांकाकडे आपण झपाट्याने चाललो आहोत. पान का सडले? भाकरी का करपली आणि घोडा का अडला? ह्या प्रश्नांचे एकच उत्तर ’न फिरवल्याने’ असे ज्याप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे वजन का वाढले? गुडघे का दुखतात? मान, पाठ का दुखते? हृदयविकार का झाला?रक्तदाब का वाढला? पचन का होत नाही? इत्यादी हजारो प्रश्नांचे उत्तर ’योग्य हालचाल न झाल्याने’ असे एकच आहे.
या शरीराला सदैव निरोगी, लवचीक ठेवण्यासाठी काय करावे? काय करू नये? याचे विवेचन एका तज्ज्ञ डॉक्टरांच्या लेखणीतून. फक्त शरीराचीच नव्हे, तर मनाचीही मशागत करणारे, आरोग्यवर्धनासाठी योग्य-अयोग्यतेचे धडे देणारे! प्रत्येकाने अवश्य संग्रही ठेवावे असे पुस्तक.
डॉ. राजीव चिंतामण शारंगपाणी
Pickup available at HO
Usually ready in 24 hours