शेकडो तरुण-तरुणींनी आपल्या घराची उब आणि नियमित आयुष्याची सुरक्षितता सोडून दिली आणि संयम, सेवा आणि समर्पण यांचा मार्ग स्वीकारला. त्यातले अनेकजण कधी घरी परतलेच नाहीत, त्यांनी आपले तारुण्य, आपली स्वप्ने आणि काही प्रसंगी आपला जीवही भारतमातेच्या वेदीवर समर्पित केला. आणि तरीही इतिहास त्यांना लक्षात ठेवायचं विसरुनच गेला. या आठवणी पुसून टाकणं हे दुर्दैवी आणि अन्यायकारक होतं. हा ढासळलेला नैतिक समतोल पुनस्र्थापित करायचं काम या पुस्तकाने अत्यंत प्रामाणिकपणे आणि अधिकारवाणीने केलं आहे. हे पुस्तक कंठाळी प्रचार करत नाही तर अंतर्दृष्टी देतं. स्तुतीचे इमले उभारत नाही तर जाणिवा संपत्र करतं. हे पुस्तक वाचणं म्हणजे एका ऋणातून उतराई होणं आहे. प्रत्येक भारतीयाने हा अनुभव घ्यायलाच हवा.
विवेक अग्निहोत्री चित्रपट निर्माता व दिग्दर्शक
Pickup available at HO
Usually ready in 24 hours