Skip to product information
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Overview:
* जग एकमेकांशी जोडले जात आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहे. त्यामुळे जगातील मोठ्या घडामोडींचा परिणाम भारतावर होणे, अनिवार्य आहे. तो परिणाम नेमका कसा, याचे विश्लेषण म्हणजे, जग बदलताना हे पुस्तक! * जागतिक रचना बदल ही एक संथ पण निश्चितपणे पुढे जाणारी प्रक्रिया असते. जगातील त्या-त्या वेळी घडणाऱ्या घडामोडींना येऊ घातलेल्या बदलांचे आयाम असतात. त्याची समर्पक मांडणी लेखक श्रीराम पवार यांनी केली आहे. * जागतिक बदलांमध्ये राष्ट्रे आणि त्याचे नेतृत्व करणारे त्या-त्या वेळेचे नेते यांच्या धारणा, भूमिका यांना महत्त्व असते. या नेत्यांच्या धोरणांचे विवेचन यामध्ये आहे. * चीनच्या स्पर्धेच्या झळा अमेरिकेला भारताकडे खेचणाऱ्या आहेत. तर युक्रेनच्या युद्धाने भारत-रशिया संबंधांचे आयाम बदले आहेत. ते कसे यांची उत्तरे देणारे पुस्तक! पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. लेखकाविषयी माहिती : श्रीराम पवार हे पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात २८ वर्षे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते सकाळ माध्यम समूहाचे संचालक-संपादक होते. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत. मोदी २.० (भाग १ ते ३), अस्वस्थ पर्व, मोदीपर्व, धुमाळी, राजपाठ, जगाच्या अंगणात, ड्रॅगन उभा दारी, या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच संवादक्रांती या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
* जग एकमेकांशी जोडले जात आहे. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनत आहे. त्यामुळे जगातील मोठ्या घडामोडींचा परिणाम भारतावर होणे, अनिवार्य आहे. तो परिणाम नेमका कसा, याचे विश्लेषण म्हणजे, जग बदलताना हे पुस्तक! * जागतिक रचना बदल ही एक संथ पण निश्चितपणे पुढे जाणारी प्रक्रिया असते. जगातील त्या-त्या वेळी घडणाऱ्या घडामोडींना येऊ घातलेल्या बदलांचे आयाम असतात. त्याची समर्पक मांडणी लेखक श्रीराम पवार यांनी केली आहे. * जागतिक बदलांमध्ये राष्ट्रे आणि त्याचे नेतृत्व करणारे त्या-त्या वेळेचे नेते यांच्या धारणा, भूमिका यांना महत्त्व असते. या नेत्यांच्या धोरणांचे विवेचन यामध्ये आहे. * चीनच्या स्पर्धेच्या झळा अमेरिकेला भारताकडे खेचणाऱ्या आहेत. तर युक्रेनच्या युद्धाने भारत-रशिया संबंधांचे आयाम बदले आहेत. ते कसे यांची उत्तरे देणारे पुस्तक! पश्चिम आशियातील तणाव, संघर्ष अर्थकारणात उलथापालथ घडवतात, तेव्हा त्याचे परिणाम अटळ असतात; अशा घडामोडींचा अर्थ व परिणाम समजून घेण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. लेखकाविषयी माहिती : श्रीराम पवार हे पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात २८ वर्षे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते सकाळ माध्यम समूहाचे संचालक-संपादक होते. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत. मोदी २.० (भाग १ ते ३), अस्वस्थ पर्व, मोदीपर्व, धुमाळी, राजपाठ, जगाच्या अंगणात, ड्रॅगन उभा दारी, या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच संवादक्रांती या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available