‘जीवन प्रवाह’ हा कवितासंग्रह डॉ. दीपक भोजराज यांनी लिहिला असून, या संग्रहात त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, जीवनविषयक दृष्टिकोन आणि आकलन त्यांच्या कवितेतून सहजपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मानवी जीवन, मनातल्या कविता, निसर्ग, सामाजिक आणि राजकीय भान, चारोळ्या, हलक्याफुलक्या कविता या विविध विषयांवर त्यांनी या पुस्तकात कविता केल्या आहेत. १३० हून अधिक कविता या संग्रहात आहेत.
कवी भोजराज यांची बहीण तरंगिणी कुलकर्णी यांच्याही काही कविता पुस्तकाच्या परिशिष्ठात समाविष्ट केल्या आहेत. प्रत्येक कविताप्रेमी वाचकाला भुरळ पडावी असा हा ‘जीवन प्रवाह’ कवितासंग्रह प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच वाचायला हवा. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours