*कृ. पं. देशपांडे लिखित क्रांतिचंद्र ही चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर आधारित कादंबरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचे दर्शन घडविते.
आझादांचे व्यक्तित्व परिस्थितीनुरूप बदलत गेले. ते ज्या सामाजिक वातावरणात वाढले तिथे धार्मिक कट्टरता, स्पृश्यास्पृश्यता, जातिभेद, स्त्रियांबद्दलची अनुदार वृत्ती होती. अशा स्थितीतून प्रगती करत १९३०च्या दशकातील ते एक अग्रगण्य क्रांतिकारी नेता कसे बनले, याचे यथार्थ वर्णन! *स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आझाद, भगतसिंग, भगवतीचरण या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला होता.
त्याकाळात त्या लढ्याचे महत्त्वाचे स्थान होते. तेच कादंबरीत अधोरेखित केले आहे. कादंबरीमध्ये रंजकता असूनही त्याकाळचे सशस्त्र क्रांतीचे महत्त्व, त्यातील क्रांतिकारकांच्या स्वभावाचे वास्तवदर्शी चित्रण यामध्ये असल्याने ती ऐतिहासिक दस्ताऐवज ठरली आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours