सतीश चंद्र लिखित ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या पुस्तकात आठव्या ते अठराव्या शतकादरम्यानच्या भारतीय उपखंडातील इतिहासाचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे.
चोळ, बहामनी आणि विजयनगर या राज्यांचा इतिहास , सूर, लोदी, दिल्ली सल्तनत आणि मोगल यांचा पडलेला प्रभाव , रजपूत राजे आणि मराठ्यांचे महत्त्व , सुफीवाद आणि भक्ती चळवळ यांसारख्या धार्मिक चळवळी
बदलत जाणारे राजकीय, आर्थिक आणि कृषिविषयक चित्र
सतीश चंद्र (१९२२-२०१७) हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, मध्ययुगीन भारतीय इतिहासाचे प्राध्यापक आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सोशल सायन्सेसचे डीन होते. ते इंडियन हिस्ट्री काँग्रेसतर्फे राबवल्या जात असलेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडिया सोसायटीच्या ट्वेल्व्ह-व्हॉल्युम कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्टरी ऑफ इंडियन स्कीमचे अध्यक्षही होते. तसेच ते सोसायटी फॉर इंडियन ओशन स्टडीजचे उपाध्यक्ष होते.
इतिहासाचे विद्यार्थी आणि अभ्यासक यांच्यासाठी हा ग्रंथ अत्यंत अमूल्य आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours