आपल्या विचारांना चालना देणारा ‘हा शब्द’ बालपणापासूनच आपल्या आयुष्यात प्रवेश करतो. त्याच कुतूहलातून आपण असंख्य गोष्टींचा विचार करू लागतो.
त्या विचारांतून प्रश्न निर्माण होतात, त्यांची उत्तरे सापडतात आणि हळूहळू आपण स्वतःला व्यक्त करायला शिकतो. अशा वेळी कविता जर व्यक्त होण्याचे माध्यम बनली, तर मनातल्या भावना अत्यंत हळुवारपणे, जशाच्या तशा शब्दांत उतरू लागतात. विशेषतः आपल्या मनात असलेल्या व्यक्तींसाठी मनापासून लिहिलेली कविता अधिकच सुंदर आणि अर्थपूर्ण होते.
डॉ. स्मिता झंवर यांचा ‘मुक्तछंद’ हा कवितासंग्रह बालपणातील कोवळे कुतूहल, तारुण्यातील रम्य भावभावना आणि जबाबदार नागरिक म्हणून समाजाला संदेश देणाऱ्या कर्तव्यपर शब्दांनी नटलेला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours