Skip to product information
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Overview:
एकविसाव्या शतकातल्या गॅजेटने वेढलेल्या आजच्या पिढीला खरं तर हवी ती माहिती एका क्लिकवर हजर आहे; पण इतक्या बेसुमार माहितीच्या महापुरात ओलेचिंब होऊनही अनुभवाच्या बोलीतून आलेले संस्कारच चिरकाल टिकतात. वेळेचं महत्त्व… यशाचा उन्माद चढू न देणं… अपयशातून मार्ग काढणं… सुख म्हणजे काय? करिअरची निवड कशी करावी? माणूस म्हणून स्वत:ला कसं घडवावं? इतक्या साध्या; पण दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाच्या बाबींविषयी मुलांना मार्गदर्शन करायला कोणी वेळच काढत नाही. प्रस्तुत पुस्तक मुलांना स्वत:ला घडवावं कसं, हे तर सांगेलच; परंतु पौगंडावस्थेतल्या मुलांशी अवघड वाटणारा संवाद सोपा कसा करता येईल, याचं नेटकं मार्गदर्शनही पालक, शिक्षकांना करेल. आजची किशोरवयीन मुलं उद्याच्या भारताचं भविष्य आहेत. त्यांना सुजाण नागरिक बनवण्याबरोबरच जगावं कसं, हे सांगणारं पुस्तक! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
एकविसाव्या शतकातल्या गॅजेटने वेढलेल्या आजच्या पिढीला खरं तर हवी ती माहिती एका क्लिकवर हजर आहे; पण इतक्या बेसुमार माहितीच्या महापुरात ओलेचिंब होऊनही अनुभवाच्या बोलीतून आलेले संस्कारच चिरकाल टिकतात. वेळेचं महत्त्व… यशाचा उन्माद चढू न देणं… अपयशातून मार्ग काढणं… सुख म्हणजे काय? करिअरची निवड कशी करावी? माणूस म्हणून स्वत:ला कसं घडवावं? इतक्या साध्या; पण दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाच्या बाबींविषयी मुलांना मार्गदर्शन करायला कोणी वेळच काढत नाही. प्रस्तुत पुस्तक मुलांना स्वत:ला घडवावं कसं, हे तर सांगेलच; परंतु पौगंडावस्थेतल्या मुलांशी अवघड वाटणारा संवाद सोपा कसा करता येईल, याचं नेटकं मार्गदर्शनही पालक, शिक्षकांना करेल. आजची किशोरवयीन मुलं उद्याच्या भारताचं भविष्य आहेत. त्यांना सुजाण नागरिक बनवण्याबरोबरच जगावं कसं, हे सांगणारं पुस्तक! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available