Skip to product information
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Author:
Rajendra Singh | राजेंद्र सिंह
Pages:
140
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
पाणी व्यवस्थापन आणि जल संधारणाची मूलतत्त्वे कोणती? ती आचरणात कशी आणता येतील? भूजल पातळी वाढवण्यासाठी काय करायचे? पाण्याचा योग्य वापर म्हणजे नेमके काय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंह तरुण भारत संघ या संस्थेद्वारे ५० वर्षं काम करत आहेत. लोकशिक्षण आणि लोकसहभाग, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रे यांची सांगड घालून अथक प्रयत्नांद्वारे रखरखीत, शुष्क प्रदेशात त्यांनी पाणी आणले; हिरवाई फुलवली. चंबळच्या खोऱ्यातील अनेकांना आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळवून दिली. अनेक कुटुंबांची आयुष्ये समृद्ध केली. हे सारे सांगणारे वाचनीय, प्रेरणादायी आणि संग्राह्य पुस्तक निसर्ग आणि माणूस : जल स्वराज्यातून जल समृद्धीकडे लेखकाविषयी : डॉ. राजेंद्र सिंह राणा जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ असणारे डॉ. राजेंद्र सिंह राणा भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जातात. जलसुरक्षा मिळवण्यासाठी आवश्यक जलसाक्षरता रुजवण्यासाठी राजेंद्र सिंह पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. पाणी जपण्याच्या-राखण्याच्या-वाढवण्याच्या जोहडसारख्या स्थानिक जलसंधारण साधनांचे, तंत्रांचे पुनरुज्जीवन करून राजस्थानात हिरवळ फुलवली; वर्षभर पाण्याची सोय करण्यात यशस्वी. रॅमन मॅगसेसे पुरस्कार, जल व्यवस्थापन क्षेत्रातील नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज, अशा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
पाणी व्यवस्थापन आणि जल संधारणाची मूलतत्त्वे कोणती? ती आचरणात कशी आणता येतील? भूजल पातळी वाढवण्यासाठी काय करायचे? पाण्याचा योग्य वापर म्हणजे नेमके काय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंह तरुण भारत संघ या संस्थेद्वारे ५० वर्षं काम करत आहेत. लोकशिक्षण आणि लोकसहभाग, पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रे यांची सांगड घालून अथक प्रयत्नांद्वारे रखरखीत, शुष्क प्रदेशात त्यांनी पाणी आणले; हिरवाई फुलवली. चंबळच्या खोऱ्यातील अनेकांना आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळवून दिली. अनेक कुटुंबांची आयुष्ये समृद्ध केली. हे सारे सांगणारे वाचनीय, प्रेरणादायी आणि संग्राह्य पुस्तक निसर्ग आणि माणूस : जल स्वराज्यातून जल समृद्धीकडे लेखकाविषयी : डॉ. राजेंद्र सिंह राणा जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ असणारे डॉ. राजेंद्र सिंह राणा भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जातात. जलसुरक्षा मिळवण्यासाठी आवश्यक जलसाक्षरता रुजवण्यासाठी राजेंद्र सिंह पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. पाणी जपण्याच्या-राखण्याच्या-वाढवण्याच्या जोहडसारख्या स्थानिक जलसंधारण साधनांचे, तंत्रांचे पुनरुज्जीवन करून राजस्थानात हिरवळ फुलवली; वर्षभर पाण्याची सोय करण्यात यशस्वी. रॅमन मॅगसेसे पुरस्कार, जल व्यवस्थापन क्षेत्रातील नोबेल समजले जाणारे स्टॉकहोम वॉटर प्राइज, अशा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available