'पटेली' म्हणजे मुंबईच्या भाषेत "फुशारक्या' मारणे.. ही कादंबरी म्हणजे मुंबईच्या बदलत्या चेहऱ्याचे अनेक थरांत उलगडलेले चित्र आहे. गिरण गावच्या काळापासून ते IT च्या जगापर्यंत हे शहर कसं बदलत जातं. आणि त्या बदलांमध्ये माणसं कशी तुटतात, झगडतात किंवा जुळवून घेतात याचं वास्तवदर्शी चित्रण लेखकांने यामध्ये केलेले आहे. नायकाच्या आयुष्याच्या प्रवासातून स्थलांतर ,तडजोड महत्त्वकांक्षी आणि या शहरात आपलंपण मिळवण्याची किंमत काय असते हे जाणवत राहते. गाव विरुद्ध शहर, भूतकाळ विरुद्ध वर्तमान, या सगळ्या तानांमध्ये मुंबई फक्त रोमँटिक नाही तर कठोर ,असमान आणि खरी वाटते. मुंबईला समजून घ्यायचं असेल किंवा या शहरात जगण्याची किंमत काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर, महाराष्ट्र शासन साहित्य पुरस्कार मिळालेली "पटेली" ही कादंबरी आवर्जून वाचावी
Pickup available at HO
Usually ready in 24 hours