आज जात, धर्माची युद्धभूमी बनवलेली आहे. कोण आहेत ते? तर सत्ताकांक्षी, पोटांची आणि पोटांची म्हणजे पोटार्थी. सत्ताकांक्षींना पोटार्थी हवे असतात. पोटार्थी सत्ताकांक्षीचे भक्त बनतात. सत्ताकांक्षींचे ढोल पिटतात. सत्ताकांक्षी आमच्याशिवाय कुणी देशभक्त नाही असे सतत बोलत राहतात. ते विचार जे मांडतात लोकशाहीविरोधी असतात. त्याला विरोध करणाऱ्यांना ते देशद्रोही म्हणतात. दिल्लीच्या निवडणूकीचा माहोल आपण यावर्षी आपण अनुभवला आहे. सुरवातीलाच डॉ. बाबासाहेबांचे अवतरण दिले आहे त्यात त्यांनी बदमाश लोकांना देशभक्तीचा आश्रय घेणे सुलभ जाते. याचा अर्थ असा की आज देशभक्तीचा आश्रय घेतात ते बदमाश आहेत. याला इतिहास साक्षी आहे. मला खात्री वाटते की, बदमाशांना मंत्रीपदावर आरूढ होणे सुलभ जाते असे म्हणण्याची पाळी आमच्यावर कधीही येणार नाही. हे बाबासाहेबांचे विधान मात्र असत्य ठरले आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours