Skip to product information
बांगलादेश निर्मिती|1971 Chauda Diwasancha Chamatakar 1971 चौदा  दिवसांचा चमत्कार
Sale price  Rs. 198.00 Regular price  Rs. 220.00
Overview:
‘१९७१ चौदा दिवसांचा चमत्कार’ १९६५ मध्ये चीनच्या पाठिंब्याने पाकिस्तानने भारतावर हल्ला केला होता. त्यावेळी भारताने विजय मिळवला, पण त्या पराभवाची जखम पाकिस्तान विसरू शकला नाही. आणि पूर्व पाकिस्तानातील लोकशाही चिरडून पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा हेतू त्यांच्या डोळ्यांसमोर होता आणि मग, ३ डिसेंबर १९७१ च्या संध्याकाळी काश्मीरपासून राजस्थानपर्यंतच्या सीमारेषेवर पाकिस्तानने अचानक हल्ले चढवले.पंजाब प्रांतातील वीसपेक्षा अधिक शहरांवर बॉम्बवर्षाव झाला. पण भारत या सर्व परिस्थितीला सज्ज होता. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या ठाम नेतृत्वाने आणि सेनाप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या रणनितीने भारतीय सेनेने पश्चिम आणि पूर्व दोन्ही आघाड्यांवर शौर्याचा इतिहास रचला. केवळ चौदा दिवसांच्या आत पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला आणि ‘बांग्लादेश’ या नव्या राष्ट्राचा जन्म झाला. त्या १४ दिवसांच्या धैर्य, रणनिती, नेतृत्व आणि राष्ट्राभिमानाच्या अद्भुत प्रवासाची अनुभूती या पुस्तकातून तुम्हाला अनुभवता येणार आहे सोबतच लेखक विलास फडके यांनी इतिहासातील त्या निर्णायक क्षणांना आपल्या शब्दांनी जिवंत केलेले आहे, असे शब्द जे वाचताना अंगावर रोमांच आणतात आणि भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देतात. हे पुस्तक वाचकांसाठी का खास आहे: तुम्ही अनुभवाल भारतीय सेनेच्या पराक्रमाची खरी कहाणी १९७१ च्या युद्धातील अनोळखी तथ्ये आणि रणनीती इंदिरा गांधी आणि सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाची झलक राष्ट्राभिमान वाढवणारी थरारक ऐतिहासिक मांडणी इतिहासप्रेमी, विद्यार्थी, आणि देशभक्त सर्वांसाठी आवश्यक वाचन हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like