सध्याचे जग सतत बदलणारे असून अभूतपूर्व भावनिक गुंते, विरोधाभास आणि भौतिक इच्छांच्या वखवखलेपणाने भरलेले आहे. या कोलाहलाशी झगडताना प्रत्येकालाच अस्तित्वविषययक प्रश्न पडू लागतात. अशा स्थितीत आत्मशांती मिळवण्यासाठी महागुरूंच्या मार्गदर्शनाची गरज असते. कारण महागुरू ज्ञानी आणि सुज्ञ असतात. सामान्य जनांना सहज स्वीकारता येणारे आत्मशांतीचे उपाय महागुरू सुचवतात. सामान्यांच्या भावनिक उलथापालथींची कारुण्यशीलतेने सजग दखल घेतात. या पुस्तकात अशाच महागुरूंच्या शक्तिशाली विचार मौक्तिकांचा संक्षेपाने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच अवतीभवतीच्या व्यापक कोलाहलात आत्मशांती मिळवण्याची गुरुकिल्ली आपलीशी करण्यासाठी सर्व स्त्री-पुरुषांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे !
Pickup available at HO
Usually ready in 24 hours