मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक प्रवास...
कधी असे प्रश्न तुमच्या मनात येतात का?
- सगळं ठीक असूनही मनात काहीतरी कमी असल्यासारखं का वाटतं?
- समाधानाचे क्षण हातात येण्याआधीच का निसटून जातात?
- भविष्याची, स्वतःची आणि कुटुंबाची चिंता सतत का सतावते?
- "तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं!" ही भावना तुमच्याही मनात दाटून येते का?
अशा असंख्य प्रश्नांचं ओझं मनात घेऊन आपण जगत असतो. विचारांचा गुंता सुटतो असं वाटतं, पण पुन्हा नवे प्रश्न समोर उभे राहतात.
याच प्रवासातून गेलेले वरूण, आयुष, नमिता, हृषिकेश, नेहा आणि प्रथमेश यांनी या पुस्तकातून स्वतःच्या भावनांना समजून घेण्याचा मार्ग शोधला. "भावना समजतात, पण उमजत नाहीत; कळतं, पण वळत नाही!" अशी त्यांची अवस्था होती. या पुस्तकाने त्यांना स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिकवलं आणि आयुष्यातील कठीण वळणांवर पुढे चालण्याची ताकद दिली.
हे पुस्तक तुमच्याही मनातील गुंता उलगडण्याचा प्रयत्न करेल. स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, भावनांशी मैत्री करण्यासाठी आणि अधिक शांत, समाधानी आयुष्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
मनाला स्पर्श करणारे, विचारांना दिशा देणारे आणि आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे.
— डॉ. राजेंद्र बर्वे
Pickup available at HO
Usually ready in 24 hours