माणसाच्या सर्व कृती व विचारांवर भावनांचे आवरण असते. एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर आधी भावना पुढे सरसावतात.
प्रबळ अशा या भावनांना थोडं मागे सारलं तरच बुद्धी नीट काम करू लागते. मेंदूच्या लिम्बिक सिस्टीममध्ये असलेल्या या सकारात्मक व नकारात्मक भावनांना कसं हाताळावं, हे शिकून घ्यावं लागतं. भावना सर्वांमध्ये असतात, पण त्यांना योग्य रीतीने हाताळण्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता मात्र आपल्याला शिकून घ्यावी लागते.
आपली मुले आपलेच अनुकरण करीत असल्याने प्रत्येक पालकाने भावनिक बुद्धिमत्ता शिकून घेण्याची व भावनांचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. भावनिकदृष्ट्या सजग राहण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन करणारे पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours