उद्योग-व्यवसायाची कुठलीही परंपरा नसताना किंवा उद्योगासाठी लागणारे व्यावसायिक शिक्षण नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर आपला स्वत:चा उद्योग सुरू करून यशाचे एव्हरेस्ट गाठणारे धीरूभाई अंबानी यांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तिदायक आहे. अगदी सुरूवातीला ज्या मुंबईने त्यांना जगण्यासाठी आवश्यक असणारे काम दिले नाही त्याच मुंबईत धीरूभाईंनी आपले उद्योगसाम्राज्य उभे केले.
एकानंतर एक नवे उद्योग सुरू करताना आपल्या उद्योगांचे इतरांवरील अवलंबित्व कमी करण्याची एक नवी पद्धत त्यांनी सुरू केली. केवळ जिद्दीच्या जोरावर आपली सारी स्वप्ने पूर्ण करणार्याग धीरूभाईंची जीवनकथा खूप काही सांगणारी रोमांचक आणि अद्भुत आहे. शून्यातून श्विस उभे करताना करावे लागणारे प्रयत्न, त्यासाठी लागणारा विचार आणि खंबीर मनोवृत्ती हे समजून घेण्यासाठी धीरूभाईंचे चरिद्धा वाचायलाच हवे.
आपल्या यशात सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांना सामील करून घेण्याची त्यांची कल्पकताही थक्क करून सोडणारी आहे. सर्वसामानय मध्यमवर्गीय गुंतवणूकदाराला भांडवलदार करून श्रीमंत होण्याचा मार्ग उपलब्ध करून देणार्यां धीरूभाईंबाबत हे सारे समजून घ्यायलाच हवे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours