Skip to product information
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Overview:
भारताचे बहुतेक शेजारी देशांशी असलेले संबंध एका वळणावर उभे आहेत. भारताच्या तुलनेत या छोट्या देशांना भारताला पूर्ण टाळणे शक्य नाही; मात्र ते भारतावरचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांत आहेत, त्याचा आढावा! चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षा, चीन-अमेरिका स्पर्धा आणि भारताचे चीनशी बदलते संबंध त्यात चीनमधील अंतर्गत बदल यांचा धांडोळा! भारताभोवतीच्या देशांमध्ये चीनचा वाढता रस आणि अमेरिका-रशियासारख्या देशांचे पारंपरिक हितसंबंध त्यात नव्या जागतिक रचनेतील स्पर्धेचे पदर यांतून प्रामुख्याने दक्षिण आशियातील राजनयाची रूढ चाकोरी बदलते आहे. याचे विश्लेषण! भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन धुमसता शेजार पुस्तकात केले आहे. लेखकाविषयी माहिती : श्रीराम पवार हे पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात २८ वर्षे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते सकाळ माध्यम समूहाचे संचालक-संपादक होते. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत. मोदी २.० (भाग १ ते ३), अस्वस्थ पर्व, मोदीपर्व, धुमाळी, राजपाठ, जगाच्या अंगणात, ड्रॅगन उभा दारी, या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच संवादक्रांती या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
भारताचे बहुतेक शेजारी देशांशी असलेले संबंध एका वळणावर उभे आहेत. भारताच्या तुलनेत या छोट्या देशांना भारताला पूर्ण टाळणे शक्य नाही; मात्र ते भारतावरचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नांत आहेत, त्याचा आढावा! चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षा, चीन-अमेरिका स्पर्धा आणि भारताचे चीनशी बदलते संबंध त्यात चीनमधील अंतर्गत बदल यांचा धांडोळा! भारताभोवतीच्या देशांमध्ये चीनचा वाढता रस आणि अमेरिका-रशियासारख्या देशांचे पारंपरिक हितसंबंध त्यात नव्या जागतिक रचनेतील स्पर्धेचे पदर यांतून प्रामुख्याने दक्षिण आशियातील राजनयाची रूढ चाकोरी बदलते आहे. याचे विश्लेषण! भारताशेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव या देशांतील महत्त्वाच्या घडामोडींचे विवेचन धुमसता शेजार पुस्तकात केले आहे. लेखकाविषयी माहिती : श्रीराम पवार हे पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रात २८ वर्षे विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. ते सकाळ माध्यम समूहाचे संचालक-संपादक होते. राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक क्षेत्रांसह नागरीकरण, पर्यावरण, दहशतवाद आदी विषयांवर ते सातत्याने लेखन करत असून, शोधपत्रकारिता आणि विश्लेषणात्मक लेखनासाठी ते परिचित आहेत. मोदी २.० (भाग १ ते ३), अस्वस्थ पर्व, मोदीपर्व, धुमाळी, राजपाठ, जगाच्या अंगणात, ड्रॅगन उभा दारी, या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. तसेच संवादक्रांती या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available