‘दिशाहीन आयुष्याचा भाग्योदय’ या आत्मकथनात सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते यशस्वी उद्योजक असा पोपटराव पाटील यांचा प्रवास आला आहे. जीवनातल्या कठोर संघर्षातूनचिकाटीने मार्ग काढत कष्टाने विजय साकारण्याची विजिगीषू वृत्ती या पुस्तकात प्राधान्याने जाणवत राहते.
मराठी माणूस आणि उद्योगक्षेत्र यात असणारी दरी पार करत ऑटोमोबाइल क्षेत्र आणि शेती या दोन विरूद्ध टोकांची सांगड घालून ‘असाध्य ते साध्य करिता सायास’ याची प्रचीती पुस्तकाच्या पानापानांतून येत राहते. लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि जीवनाच्या बहुरंगी छटांचे हृदयस्पर्शी कथन यात केले गेले आहे.
लेखकांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी हे आत्मकथन येत असल्याने लेखकाचा प्रदीर्घ काळचा अनुभव वाचकांसाठी आणि तरुण उद्योजकांसाठीमोलाचा ठरेल. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours