वैराण वाळवंटाचं जागतिक दर्जाच्या महानगरात रूपांतर घडवून आणण्याची किमया दुबईन अवघ्या दोन दशकांत करून दाखवली आहे. जगभरातल्या दोनशे देशांचे नागरिक आज दुबई व अमिरातीत गुण्यागोविंदानं नांदताहेत. दुबईच्या वैभवात भर घालताहेत. कशी घडली ही किमया ?
मुक्त व्यापाराचं महत्त्व सर्वप्रथम ओळखलं ते दुबईनं. तेही शतकभरापूर्वी. जेव्हा मुक्त आर्थिक व्यापार क्षेत्र अशा संज्ञाही कुणास माहिती नव्हत्या, तेव्हा दुबईतल्या राज्यकर्त्यांनी मुक्त व्यापारास चालना दिली. तेलाच्या शोधानंतर तेलाच्या निर्यातीतून मिळणारा पैसा दुबईच्या विकासासाठीच वापरला. त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण केल्या. त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान व तज्ज्ञ जगभरातून मायदेशात आणले. कट्टर धार्मिकतेस फाटा देत सर्व धर्मीयांना सामावून घेत विकासाच्या वाटेवर खंबीरपणे वाटचाल केली.
दूरदृष्टी, खंबीर नेतृत्व, निर्णयांची कठोर अंमलबजावणी आणि परिवर्तनासाठी आवश्यक तो मोकळेपणा या सर्वांच्या बळावर आज दुबईनं आपला ब्रँड निर्माण केला आहे. एखाद्या संपन्न देशाची उभारणी कशी करावी लागते, याचा वस्तुपाठ दुबईच्या राज्यकर्त्यांनी घालून दिला आहे. त्याचीच ही संक्षिप्त ओळख...
Pickup available at HO
Usually ready in 24 hours