२००० साली स्थापनेपासून पाकिस्तानच्या पाठबळावर काम करणाऱ्या आणि अखिल-इस्लामवादी विचारसरणी असलेल्या जैश-ए-मोहम्मद (जेएम) या दक्षिण आशियाई दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये अनेक भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तान दोनदा पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. हे पुस्तक जैश-ए-मोहम्मदवरचे पहिले सविस्तर आणि सर्वसमावेशक अध्ययन आहे.
यात या संघटनेची सुरुवात कशी झाली, तिची विचारसरणी काय आहे, तिची संघटन रचना कशी आहे, पैसा कुठून येतो, हल्ल्यांचे डावपेच काय आहेत, तरुणांना कट्टर बनवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, फिदायीन हल्ले कसे केले जातात आणि माहितीची जाळी कशी काम करतात -याचा सखोल आढावा घेतला आहे.
डॉ. अभिनव पांड्या यांनी केलेल्या प्रत्यक्ष क्षेत्रीय संशोधनात माजी आणि सध्या सक्रिय सदस्य, ओव्हरग्राउंड कार्यकर्ते, पत्रकार तसेच गुप्तचर आणि सुरक्षा क्षेत्रातील अनुभवी अधिकारी यांची मुलाखत समाविष्ट आहे. तसेच गुप्तचर अहवाल, प्रकरणांची आरोपपत्रे आणि संघटनेवरील गोपनीय कागदपत्रांचाही आधार घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या पुनरागमनानंतर जैश-ए-मोहम्मदची कार्यक्षमता वाढल्याचे मानले जाते. त्यामुळे या संघटनेचा भूतकाळ, वर्तमान आणि पुढील संभाव्य दिशा समजून घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरते.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours