Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Author:
Baba Bhand | बाबा भांड
Pages:
-
Publisher:
साकेत प्रकाशन | Saket Prakashan
Language:
Marathi
Overview:
‘काजोळ’ ही एका संस्कारक्षम संवेदनशील बालमनाची उत्कट अभिव्यक्ती आहे. ते बालमन मानवी मनाचा विविधांगी तळ शोधू पाहते. या उत्कट बालमनाला संवेदनशीलतेचे धुमारे फुटू लागतात. नितळ, पारदर्शी, संस्कारशील बालमन आणि त्यावर उमटणारे जीवनानुभवाचे ठसे स्पंदनशील आणि सचेतन असतात. कोऱ्या पाटीसारखं असलेलं हे मन अनुभवाच्या अक्षरमुद्रा अधोरेखित करत जाते.. यात ग्रामपातळीवरील बेरकी, धूर्त, मतलबी संबंध, व्यसन-बाहेरख्यालीपणा या अपप्रवृत्ती, परस्परांतील हेव्या-दाव्यांचे, असूया-मत्सराचे प्रगटीकरण, मानवी जीवनातील काळ्याकुट्ट ढगांना आढळणारी सत्प्रवृत्तींची सोनेरी कडा, दुःखगर्भ अडचणीतही परिसाच्या हाताची मिळणारी मदत, गरिबी अन् दारिद्र्यानं पिडलेल्याचा शिकण्यासाठी चाललेला संघर्ष- हे सगळं जगण्याचा भाग म्हणून ‘काजोळ’मध्ये आलंय. कथानायकाची शिक्षणासाठीची धडपड, वास्तव कटु-कठोर जीवनानुभवाचं दर्शन, शाळासोबत्यांचा निर्मळ निर्व्याजपणा, प्रयणांकुराची अस्फुट चाहूल, तसेच साहसाची ऊर्मी इथं आहे. लेखकाने खेड्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून सांगितलेली रोमहर्षक व भावविभोर अशी ही कथा आहे. या अल्पशा प्रवासात भेटलेल्या असंख्य मित्र-मैत्रिणींच्या, शिक्षक-हितचिंतकांच्या लागेबांध्यांची, अतूट अशा भावबंधाची ही जणू प्रेमकहाणी आहे. लेखकाची बालमनाची समजही सूक्ष्म-सखोल आहे. बालमनाची हळवी कातरता, उदासीन हळुवारता आणि कोमल भावुकता ‘काजोळ’मध्ये सर्वत्र आढळते. यातील भाषा प्रसन्न आणि सुबोध आहे; तसेच तिला विलोभनीय डौल आणि सुखद गती आहे. ‘काजोळ’चा रूपबंध कादंबरीसदृश असला, तरी त्याला प्रसन्न ललित गद्द्याचा घाट प्राप्त झाला आहे. तसेच गद्यलेखनास आत्मपर लेखनरीतीची डूब मिळाल्यामुळे ते अधिक भावस्पर्शी व आस्वाद्य झालेले आहे. – डॉ. एस. एम. कानडजे हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
‘काजोळ’ ही एका संस्कारक्षम संवेदनशील बालमनाची उत्कट अभिव्यक्ती आहे. ते बालमन मानवी मनाचा विविधांगी तळ शोधू पाहते. या उत्कट बालमनाला संवेदनशीलतेचे धुमारे फुटू लागतात. नितळ, पारदर्शी, संस्कारशील बालमन आणि त्यावर उमटणारे जीवनानुभवाचे ठसे स्पंदनशील आणि सचेतन असतात. कोऱ्या पाटीसारखं असलेलं हे मन अनुभवाच्या अक्षरमुद्रा अधोरेखित करत जाते.. यात ग्रामपातळीवरील बेरकी, धूर्त, मतलबी संबंध, व्यसन-बाहेरख्यालीपणा या अपप्रवृत्ती, परस्परांतील हेव्या-दाव्यांचे, असूया-मत्सराचे प्रगटीकरण, मानवी जीवनातील काळ्याकुट्ट ढगांना आढळणारी सत्प्रवृत्तींची सोनेरी कडा, दुःखगर्भ अडचणीतही परिसाच्या हाताची मिळणारी मदत, गरिबी अन् दारिद्र्यानं पिडलेल्याचा शिकण्यासाठी चाललेला संघर्ष- हे सगळं जगण्याचा भाग म्हणून ‘काजोळ’मध्ये आलंय. कथानायकाची शिक्षणासाठीची धडपड, वास्तव कटु-कठोर जीवनानुभवाचं दर्शन, शाळासोबत्यांचा निर्मळ निर्व्याजपणा, प्रयणांकुराची अस्फुट चाहूल, तसेच साहसाची ऊर्मी इथं आहे. लेखकाने खेड्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून सांगितलेली रोमहर्षक व भावविभोर अशी ही कथा आहे. या अल्पशा प्रवासात भेटलेल्या असंख्य मित्र-मैत्रिणींच्या, शिक्षक-हितचिंतकांच्या लागेबांध्यांची, अतूट अशा भावबंधाची ही जणू प्रेमकहाणी आहे. लेखकाची बालमनाची समजही सूक्ष्म-सखोल आहे. बालमनाची हळवी कातरता, उदासीन हळुवारता आणि कोमल भावुकता ‘काजोळ’मध्ये सर्वत्र आढळते. यातील भाषा प्रसन्न आणि सुबोध आहे; तसेच तिला विलोभनीय डौल आणि सुखद गती आहे. ‘काजोळ’चा रूपबंध कादंबरीसदृश असला, तरी त्याला प्रसन्न ललित गद्द्याचा घाट प्राप्त झाला आहे. तसेच गद्यलेखनास आत्मपर लेखनरीतीची डूब मिळाल्यामुळे ते अधिक भावस्पर्शी व आस्वाद्य झालेले आहे. – डॉ. एस. एम. कानडजे हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available