Skip to product information
Rs. 140.00
Author:
Yuvraj Kore | युवराज कोरे
Pages:
92
Publisher:
Sakal Publications | सकाळ पब्लिकेशन्स
Language:
Marathi
Overview:
माहितीपर आणि प्रबोधनात्मक अशा १० लेखांचा संग्रह असलेले हे युवराज कोरे लिखित पुस्तक म्हणजेजनजागृतीचा एक वेगळा प्रयत्न आहे. रेशनकार्ड, शेतजमिन, पर्यावरणीय समस्या या संदर्भातील सर्वसामान्य जनतेला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्या त्या विषयावर लिहिलेल्या लेखातून लेखकाने दिली आहेत. तरुणांनी जरूर पाहावेत अशा चित्रपटांची सविस्तर यादीही त्यांनी एका प्रकरणात दिली आहे. अनेक कागदपत्रांचे आणि अर्जांचे नमुनेही त्यांनी या पुस्तकात समाविष्ट केले आहे. आजच्या घडीला देशासमोर असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबतचे विचारमंथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. सदर पुस्तकामध्ये पुरंदर किल्ल्याचे मनोगतही त्यांनी लिहिले आहे. हे पुस्तक आपण एका विशिष्ट भूमिकेतून लिहिलेले आहे हे लेखकाच्या मनात स्पष्ट आहेच पण त्याचबरोबर त्यांनी प्रस्तावनेत ते अधोरेखित केले आहे. ते म्हणतात, “या पुस्तकाचा हेतू समाज प्रबोधन करणे आहे. वाचकांची घटकाभर करमणूक करणेअसा हेतू नाही. करमणुकीसाठी बाजारात इतर पुस्तके भरपूर मिळतात.सदर पुस्तक समाजातील कोणत्या ही गटावर-घटकावर, तसेच वैयक्तिक टीका करणारे नाही. तसा पुस्तकाचा हेतू नाही. समाज प्रबोधन करणे, समाजाला योग्य दिशा देणे, जीवन कसे सुखी करावे, देश महान कसा करावा याविषयी मार्गदर्शन करणारे आहे.” हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
माहितीपर आणि प्रबोधनात्मक अशा १० लेखांचा संग्रह असलेले हे युवराज कोरे लिखित पुस्तक म्हणजेजनजागृतीचा एक वेगळा प्रयत्न आहे. रेशनकार्ड, शेतजमिन, पर्यावरणीय समस्या या संदर्भातील सर्वसामान्य जनतेला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्या त्या विषयावर लिहिलेल्या लेखातून लेखकाने दिली आहेत. तरुणांनी जरूर पाहावेत अशा चित्रपटांची सविस्तर यादीही त्यांनी एका प्रकरणात दिली आहे. अनेक कागदपत्रांचे आणि अर्जांचे नमुनेही त्यांनी या पुस्तकात समाविष्ट केले आहे. आजच्या घडीला देशासमोर असलेल्या अनेक समस्यांचे निराकरण कसे करता येईल याबाबतचे विचारमंथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. सदर पुस्तकामध्ये पुरंदर किल्ल्याचे मनोगतही त्यांनी लिहिले आहे. हे पुस्तक आपण एका विशिष्ट भूमिकेतून लिहिलेले आहे हे लेखकाच्या मनात स्पष्ट आहेच पण त्याचबरोबर त्यांनी प्रस्तावनेत ते अधोरेखित केले आहे. ते म्हणतात, “या पुस्तकाचा हेतू समाज प्रबोधन करणे आहे. वाचकांची घटकाभर करमणूक करणेअसा हेतू नाही. करमणुकीसाठी बाजारात इतर पुस्तके भरपूर मिळतात.सदर पुस्तक समाजातील कोणत्या ही गटावर-घटकावर, तसेच वैयक्तिक टीका करणारे नाही. तसा पुस्तकाचा हेतू नाही. समाज प्रबोधन करणे, समाजाला योग्य दिशा देणे, जीवन कसे सुखी करावे, देश महान कसा करावा याविषयी मार्गदर्शन करणारे आहे.” हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup currently not available