स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात जे अक्षर-ग्रंथ निर्माण झाले त्यात 'माणदेशी माणसं'चा समावेश होतो, या व्यक्तिचित्रांत जुन्या कथेतील गोष्ट तर आहेच पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नवलकथेची किमयादेखील आहे.
अंधारातून पहाट व्हावी, कळीचे फूल व्हावे इतक्या सहजतेने रेखाटलेली ही चित्रे अस्सल मराठी आहेत. दरिद्री माणदेशातील, सामान्य जीवनातील न संपणारं दुःख निरागसपणे व्यंकटेश माडगूळकर सांगतात. हे दुःख पाहिलं की मन भांबावतं. माणसं सुखासाठी धडपडतात, पण त्यासाठी ती जन्माला आलेली नसतात असा उदार विचार मनात येतो. जीवनातील हे कारुण्य माडगूळकरांनी कलावंताच्या अलिप्ततेने टिपले आहे त्यामुळं त्यांची ही माणसं आपल्याला विसरता येत नाहीत. त्यांची आठवण झाली की ती मनाला अस्वस्थ करून टाकतात...
Pickup available at HO
Usually ready in 24 hours