हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत 'सरसेनापती' पद खूप महत्त्वाचे होते. स्वराज्याच्या पायाभरणीत पहिले सरसेनापती माणकोजी दहातोंडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. तर स्वराज्यावर चारही बाजूंनी संकटे आलेली असताना त्यांच्याशी दोन हात करणाऱ्या सरसेनापती नेतोजी पालकरांनी आपल्या अजोड शौर्याची चुणूक दाखवली. नेतोजी पालकर स्वराज्याचे दुसरे सरसेनापती होते. यांच्या काळात स्वराज्याचा चांगला विस्तार झाला. थेट मिर्झाराजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन धाडसी हल्ला करणारे प्रतापराव गुजर हे स्वराज्याचे तिसरे सरसेनापती होत. साल्हेर येथील खुल्या मैदानात त्यांनी गाजवलेले शौर्य, बहलोलखानाचा केलेला पराभव अशा अनेक मोहिमांमध्ये त्यांना निर्भेळ यश मिळाले.
प्रतापराव जेवढे शूर, तेवढेच दिलदार व जेवढे जिगरबाज तेवढेच भावनाशील होते. शत्रूच्या सैन्याचा थरकाप उडवणाऱ्या शिवरायांच्या पहिल्या तीन सरसेनापतींचा थोडक्यात लेखाजोखा सरसेनापती खंड १ मध्ये मांडण्यात आला आहे
Pickup available at HO
Usually ready in 24 hours