Skip to product information
Samarthya Vicharanche
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Overview:
चांगले विचार वाचले की आपल्या कृतीतून ते विचार नकळत पाझरत राहतात. सुविचारांचे अर्थात चांगल्या विचारांचे हेच सामर्थ्य असते, आणि म्हणून ‘सामर्थ्य विचारांचे’ हे पुस्तक महत्त्वाचे आणि वाचनीय ठरते. शालेय वयात प्रत्येक माणूस सुविचार शिकत असतो. हे सुविचार आयुष्यभर सोबत करत असतात. हे विचार समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरत असतात. ते समाजासमोर एक आदर्श ठेवायचा प्रयत्न करत असतात. संग्राहक सतीश सूर्यवंशी यांनी हा संग्रह करून एक मोठे काम केले आहे. सध्याच्या गोंधळलेल्या समाजात अशा सुविचारांची अत्यंत आवश्यकता आहे. सूर्यवंशी यांनी ही उणीव भरून काढलेली आहे. मानवी मनाला जागृत करण्यासाठी हा सुविचारांचा मोलाचा ठेवा निश्चितच उपयोगी पडेल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like