विजयामुळे स्वराज्यसैन्यास प्रचंड स्फुरण चढले होते. स्वतःची हानी होऊ न देता शत्रूस गुढग्यावर बसायला भाग पडणारी बाजीरावांची रणनीती सर्वांस आकर्षित करत होती. आपल्या पंतप्रधानांवर सैन्याचा विश्वास अधिक दृढ झालेला होता
स्वराज्यास अखंड हिंदुस्तानात वलय प्राप्त होत होते. दक्षिणेत स्वराज्यसैन्य मुक्तपणे कुठेही जाऊ शकणार होते. उत्तरेत गुजरात आणि माळव्यात त्यास अडवणारे कोणी नव्हते. शाहू महाराजच स्वराज्याचे छत्रपती आहेत. ह्याबाबत आता कोणीही शंका उपस्थित करूच शकत नव्हते. पंतप्रधान बाजीरावांचा दरारा संपूर्ण हिंदुस्तानात वाढत चालला. शाहू महाराजांचा देखील आपल्या पंतप्रधानांवरचा भरवसा अधिक वाढला. सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा परिणाम झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेले स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जवळ जवळ तीस वर्षांनी पुन्हा मोघलांच्या तावडीतून मुक्त होत हेते.
स्वराज्य विस्ताराची गाथा उलगडणारी आणि पेशवे बाजीराव - चिमाजी अप्पा यांच्या कुशल नेतृत्व, शौर्य, पराक्रम, कुटनिति, मुत्सद्देगिरी अशा विविध अंगांनी नटलेली शौर्यदर्शी महाकादंबरी
Pickup available at HO
Usually ready in 24 hours