दहशतवाद्यांच्या 'ताज'मधल्या त्या ६८ तासांच्या तांडवाचं शोध पत्रकारितेतून प्रत्ययकारी वर्णन करणारं अधिकृत पुस्तक
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा हद्दीत घुसून भारताच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देण्याच्या उद्देशाने पाकिस्तानन घडवून आणला होता. या हल्ल्याचं एक प्रमुख लक्ष्य होतं 'ताज' भारत सर्वाधिक असुरक्षित देश असल्याचा संदेश जगातल्या प्रत्येक देशापर्यंत पोचवण्यासाठी अत्यंत विकृत मानसिकतेतून 'ताज'वरील हल्ल्याचं कारस्थान रचलं गेल होत. २६ नोव्हेंबर रोजी 'ताज'मध्ये त्या दुर्दैवी रात्री आणि त्यानंतरच्या ६८ तासांत नक्की काय घडलं, याचा वृत्तांत नेमकेपणानं नोंदवणार हे पुस्तक
ही कहाणी आहे 'ताज'च्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या धैर्याची, शौर्याची आणि संयमाची ही कहाणी आहे 'ताज'मध्ये असलेल्या ग्राहकांच्या आणि पाहुण्यांच्या वेदनांची ही कहाणी आहे मुंबईवरील हल्ला परतवून लावणान्या जवानांची आणि कणखर पोलिसाची ही कहाणी आहे सरकारी यंत्रणेच्या लालफितीच्या कारभाराची ही कहाणी आहे पाकिस्तानच्या दहशतवादी भेसूर चेहऱ्याची आणि कोट्यवधी भारतीयांच्या मनात खोलवर जखम करणान्या घृणास्पद हल्ल्याची
Pickup available at HO
Usually ready in 24 hours