अखेर महायुद्ध संपलं… भीषण संहार… रक्ताचे पाट… प्रेतांचे ढीग…
“महायुद्धानंतर माझी आंतरिक जडणघडण पार बदलून गेली, कोलमडून पडली आणि अनेक आंतरिक उलथापालथींमधून नवाच मी निर्माण झालो. आता सिंहावलोकन करताना, मला माझे, माझ्या व्यक्तिमत्त्वाचे दोन भाग झालेले दिसतात. पहिला भाग महत्वाकांक्षी, सर्वश्रेष्ठ होण्याची तीव्र आस असलेल्या राजपुत्राचा तर दुसरा भाग वास्तवाच्या दर्शनाने स्तिमित झालेल्या मानवप्राण्याचा. हो, मी असेन दैवीपुत्र परंतुः महायुद्ध दर्शनानंतर मी उरलो तो केवळ एक मानव…”
श्रीकृष्ण, भीष्म, द्रोणाचार्य, कुंती, युधिष्ठिर, दुर्योधन, द्रौपदी, अग्ग्री, अश्वसेन, एकलव्य, सात्यकी, बृहन्त्रडा, शिखंडी आणि अर्जुन यांच्या मनोगतांमधून उलगडलेली एका महायोद्ध्याच्या वीरत्वाची आणि मानसिक आंदोलनांची कहाणी… वीर योद्धा अर्जुन !
Pickup available at HO
Usually ready in 24 hours