विज्ञानाचे कार्य कसे होते, वैज्ञानिक कशा प्रकारे कार्य करतात, विज्ञानवृत्तीमुळे समाजाच्या आर्थिक, सामाजिक व तांत्रिक विकासात कसा बदल घडून येतो, अशा प्रकारची वैज्ञानिक वृत्ती जोपासणे कसे आवश्यक आहे या सर्वांचे महत्त्व विशद करणारे पुस्तक म्हणजे ‘विज्ञानवृत्ती’ होय. शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड, कुतूहल निर्माण व्हावे व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे.
विज्ञानवृत्तीशिवाय समाजाचा विकास आणि मूलभूत परिवर्तन शक्य नाही. परिश्रम, जिद्द, प्रायोगिक वृत्ती, कल्पकता या गुणांचा विकास होण्यासाठी विज्ञानवृत्ती अतिशय आवश्यक असते.
वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असणे आवश्यक आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours